"काय शिकलो आपण?"
- OM Dental Satara
- Apr 29, 2021
- 2 min read
- डॉ ऐश्वर्या मोरे
एका छोट्याशा व्हायरस ने संपुर्ण माणुसकीला हद्रवलंं.. समाजाला गुडघ्यावर येऊन ऑक्सिजन साठी विणवणी करण्यास भाग पाडलं..
बेड, डॉक्टर व औषधे यांची मागणी प्रचंड प्रमाणात वाढवली.. ते देखील एका वर्षात , दुसऱ्यांदा.. !
पण सामान्य माणूस या सर्वाला अत्यंत धीराने सामोरे गेला… खूप संयमाने वागून, स्वतः हाल-अपेष्टा सोसाव्या लागल्या तरी इतरांना सहकार्य करून .. या परीक्षेच्या कठीण काळात यशस्वीरित्या स्वतःला सिद्ध करत गेला...
पण Health system ची मात्र कुचुंबना झाली...
प्रश्न हा होता की.. एवढया आधुनिक टेक्नॉलॉजी च्या काळात राहून देखील आपण एका व्हायरसला का हरवू शकलो नाही?
डायबेटिस, BP, स्ट्रोक, COPD, हृदैविकार आसण्याऱ्या लोकांसाठी कठीण वेळ आली.. त्यात जे लोक वेळेत औषधे घेत न्हवते..रोज अत्याधिक प्रमाणात साखर, फॅट्स, खात होते.. वेळेत न झोपणे.. जागरण..वेळी अवेळी जेवणे.. स्ट्रेस.. सततचा ताण तणाव.. ज्यांनी आपल्या HEALTH LIFESTYLE वर कधीही जोर दिला नाही.. त्यांच्यासाठी मात्र अवघड वेळ आली..
आत्तापर्यंत आयुष्य कसे जगत आलात आणि आता अचानक केलेला, झालेला हा बदल..
हा बदल नुसता शरीरात नव्हें तर आपल्या वातावरणात देखिल झालेला आहे... जिथे प्रचंड प्रमाणात प्रदूषण व त्याचा फुफ्फुसांवर होणारा परिणाम स्पष्ट दिसतोय..!
पोषण देणारे जेवण, व्यायाम, झोप, भावनिक आरोग्य हे आपल्या रोगप्रतिकारशक्तीलाला वाढवणारे घटक आहेत.. पण आपण यांना नेहमीच दाबून ठेवतो.. लस व औषधे तर आहेचच पण या पलीकडे जाऊन आपण काय करतोय? आपण कायमच खूप बिझी असतो..
पण कशासाठी?
काही लोक एकही symptom न दाखवता बरे होतायत.. तर काही जणं थोड्या औषधाने होम इसोलेशन मधे बरे होत आहेत.. तर काहीजण व्हेंटिलेटर व ऑक्सिजन साठी तडफडत आहेत..?
हे असे का?
मान्य आहे की Preventive medicine ची ही वेळ नाहीये.. पण आपण यापुढे एक असे जग निर्माण करू शकतो जिथे .. सर्वांकडे भरपूर अशी रोग प्रतिकारशक्ती असेल..
त्यासाठी निसर्गाच्या rhythm मध्ये राहणं गरजेचं आहे.. निसर्गाच्या विरुद्ध जाऊन आपण आपले vibrations पूर्णपणे बिघडवू शकतो..
एक झोप पूर्ण न झालेलं शरीर एवढी शक्ति दर्शवू शकत नाही.. बिडी, सिगारेट पिणारे फुफ्फुस एवढी शक्ती दर्शवू शकत नाही.. दारू पिलेले लिव्हर..ताण तणाव सहन करणारे मन.. कमजोर मन एवढी शक्ति दर्शवू शकत नाही..
मनातली भीती काढून टाकणं, मास्क घालने, सोशल distance पाळणे, लस टोचून घेणे, स्वतःच स्वतःर उपचार न कारणे.. गर्जचे आहे.
या वर्षी हा व्हायरस आहे.. पुढील काळात कुठलाही व्हायरस , बॅक्टरिया किंवा फंगस येऊ दे..
स्वतःच्या शरीराला व मनाला इतकं सक्षम बनवणं की कोणताही रोग झाला तरी त्यातनं यशस्वी रित्या बाहेर येता आलं पाहिजे.. मग त्यासाठी लागणारा योग्य आहार, व्यायाम, झोप, मानसिक व भावनिक आरोग्य, श्रद्धा, प्रार्थना, विश्वास, प्रेम, सहकार्य व सर्वात मह्त्वाचं निसर्ग..!
चंद्र आणि मंगळावर जीवन शोधणारा माणूस..
आज पृथ्वीवर स्वतःच अस्तित्व टिकवण्यासाठी तडफडतोय..
ऑक्सिजन साठी धडपडतोय..
आपण या सर्वातून लवकरच बाहेर येऊ,
पण तेव्हा एक गोष्ट मात्र विसरू नका की आपण, जमिनी साठी भांडलो नाही.. ना घरा साठी.. ना शस्त्र..ना दागिणे..
मालमत्ते साठी भांडलो नाही..
ना बस ची सीट ना तिकीटे.. ना राजकारण.. ना धर्म.. ना कंपनी चे शेअर्स..
आपण भांडलो.. तडफडलो..
ते फक्त ऑक्सिजन साठी... श्वासासाठी.. जगण्यासाठी..
निसर्गाचे महत्त्व लक्षात घ्या...!
- डॉ ऐश्वर्या मोरे
सातारा
תגובות